व. पु

रंग मनाचे

' नावात काय आहे?' - हा प्रश्न तसा जगजाहीर.नावात खरचं तसं काही नाही.ते नाव घेवुन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला ह्याला जास्त महत्व. तुम्हांला कोणते आईवडील लाभले त्यावर बरचसं अवलंबुन.तुमचा बँकबँलन्स पण नजरेआड करता येणार नाही.
पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजुतल्या एका ताटलीतल्या.दुसरी ताटली तुमची स्व:तची.ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबुन.

'इट जस्ट हँपन्स' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात , ती जास्त जगतात.अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल.काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं.
पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य?
'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे.'
अकरा शब्दांत समर्थांनी सगळं आयुष्य उकलुन दाखवलं.

कोणत्याही व्यक्तिच्या मृत्यूबद्दल, त्याची हळहळ संपली की स्मारकं संपली.
राहतात त्या तसबिरी.

दुर्गुणांना अनेक रुपं धारण करता येतात.आणी इतकी ती आकर्षक असतात.

माणसाच्या मनाचे व्यापार सहजासहजी कसे समजणार?ज्याचा तोही सांगु शक्त नाही, मग इतरांनी शिक्के मारायची घाई का करावी?

No comments:

Post a Comment