व. पु. काळे



स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर ". 


"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते".

 स्वप्न आणि ध्येय यांचा फार जवळचा संबंध आहे......स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय आणि ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न दोन्ही महत्त्वाचे आहे. या दोन्ही पैकी एकही नसेल तर तो माणूस अनोळखी मार्गावर आंधळेपणाने चालत असतो जेथे ना स्वप्नपूर्तीचा आनंद भेटतो, ना धेयापुर्तीचे समाधान भेटते ,ना जगण्याचे महत्त्व कळते....

-व. पु. काळे

No comments:

Post a Comment